स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वाढली ! निवडणुकी संदर्भात ४ मेला सुनावणी !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वाढली ! निवडणुकी संदर्भात ४ मेला सुनावणी !
महाराष्ट्र – कोर्टात या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून तारीख पे तारीख पे सुरु आहे आणि आता पुन्हा नवी तारीख मिळाली आहे.
निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पुढील सुनावणी 4 मार्चला होणार . गेल्या कित्येक दिवसांपासून तारीख पे तारीख चा सिलसिला सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे. कालदेखील सुनावणी न होताच प्रकरण लांबणीवर पडलेलं होतं. निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वाढली आहे.
तर सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून तारीख पे तारीख पे सुरु असून आता पुन्हा नवी तारीख मिळाली असल्याने . 4 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुनावणी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात अडकल्यात दोन कारणांमुळे एकतर ओबीसी आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला पण आधी जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्येही हे आरक्षण मिळावं यासाठी शिंदे सरकार कोर्टात गेलं. सोबतच मविआ (महा विकास आघाडी ) च्या काळातली वॉर्डरचना 4 ऑगस्ट रोजी एका अध्यादेशानं या सरकारनं बदलली. 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टानं जैसे थे आदेश दिला, त्यानंतर आत्तापर्यंत या प्रकरणाची सुनावणीच होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता पावसाळयानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे.



