खान्देश
ऋषींपंचमीचे औचित्य साधत महिलांनी केले गिरणामाईचे खण नारळ ओटी भरून जलपूजन…!

ऋषींपंचमीचे औचित्य साधत महिलांनी केले गिरणामाईचे खण नारळ ओटी भरून जलपूजन…!
*भडगांव (प्रतिनिधी)* : भडगांव परिसर तसेच उत्तर महाराष्ट्रास वरदान असलेल्या गिरणामाईचे महादेवाचे बांबरूड येथे गिरणा – तितर नदी संगमावर ऋषीपंचमीचे औचित्य साधत शाही स्नान करत यशस्विनी सामजिक जनजागृती अभियान महिलांनी खण नारळाची ओटी भरून जलपूजन केले. गिरणा आईची कृपा सदैव अशीच रहावी व गिरणा नदी बारमाही संथ, निर्मळ प्रवाहित रहावी यासाठी नदीपात्रात जाऊन अभियान प्रमुख योजना पाटील, मनिषा पाटील, रेखा शिरसाठ, निता भंडारकर, सुनिता पाटील, मिनाक्षी पाटील आदी महिलांनी शेतकरी बांधव व तमाम जनतेच्या सुख, समृध्दी, उत्तम आरोग्य तसेच वैभवप्राप्तीसाठी प्रार्थना केली.



