खान्देश

चांदवड जळगाव महामार्गावरून धावणाऱ्या बसेस ला रोहिणी, हिरापूर, खडकी येथे थांबा देण्याची रयत सेनेची आगार प्रमुखकांकडे मागणी

चांदवड जळगाव महामार्गावरून धावणाऱ्या बसेस ला रोहिणी, हिरापूर, खडकी येथे थांबा देण्याची रयत सेनेची आगार प्रमुखकांकडे मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी – तालुक्यातील रोहिणी, हिरापूर, खडकी येथून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शाळा महाविद्यालयात चाळीसगाव येथे येत असतात मात्र चांदवड जळगाव महामार्गावरून अनेक बसेस रोहिणी, हिरापूर, खडकी या बस थांब्यावर न थांबता धावतात यामुळे विद्यार्थ्यांना बसने प्रवास करता येत नाही, बस थांबत नसल्यामुळे शाळा महाविद्यालय येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत जाण्यास मोठी अडचण निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे चांदवड जळगाव महामार्गावरून धावणाऱ्या सर्व बसेस ला रोहिणी, हिरापूर, खडकी या बस थांब्यावर थांबा देण्याची रयत सेनेने आगार व्यवस्थापकांकडे दि १६ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे,
सकाळी ६ वाजेपासून विद्यार्थी हिरापूर, खडकी या बस थांब्यावर येऊन बस थांबण्याची गेल्या ४ दिवसापासून वाट पाहत असूनही या थांब्यावर एक ही बस विद्यार्थ्यांसाठी थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
तसेच काही बसेस थांबत असूनही विद्यार्थ्यांना बस मध्ये बसू दिले जात नाही मागून येणाऱ्या बस मधून येण्याचे बस वाहक ( कंडक्टर ) सांगतात अशात शाळा महाविद्यालयात वेळेवर जाण्यास विद्यार्थ्यांना वेळ लागतो म्हणून आपण या महामार्गावरून धावणाऱ्या बसेसला रोहिणी, हिरापूर व खडकी या बस थांब्यावर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी थांबा देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासावे अन्यथा आपल्या एसटी आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रयत सेना चक्काजाम आंदोलन करेल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी चाळीसगाव आगार व्यवस्थापक जबाबदार राहणार असल्याचे रयत सेनेने दि १६ रोजी आगार व्यवस्थापक मयूर पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे इशारा दिला आहे, निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरूड, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष आकाश धुमाळ, विद्यार्थी साई निकुंभ, मोहन दाभाडे, प्रथमेश निकुंभ, निखिल हांडे ,नितेश पाटील, महेंद्र पारधी, निलेश पाटील, धीरज मोरे ,विवेक वानखेडे ,कृष्णा सैंदाणे ,गणेश इंगळे ,शुभम साळुंखे यांच्यासह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,

चाळीसगाव आगार व्यवस्थापक मयूर पाटील यांच्याकडे विद्यार्थी बस बाबत समस्या मांडत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले बसचे चालक व वाहक विद्यार्थ्यांची अरेरावी पणे बोलत होते म्हणजेच विद्यार्थी बस वाहक चालक यांच्या बाबत आगार व्यवस्थापकांकडे तक्रार करत आहे त्याला सबळ यामुळे पुरावा निर्माण होत आहे एकीकडे बसचे उत्पन्न वाढावे यासाठी शासन अनेक नियम राज्यातील आगारांना लागू करत असताना अशा मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांशी एकेरी बोलणे व ज्या ठिकाणी बसेसला थांबा दिला आहे त्या ठिकाणी बस न थांबवणे यामुळे बस डेपोचे आर्थिक नुकसान होण्यास असे बस चालक व वाहक जबाबदार असल्याचे निर्दशनास येत आहे

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button