खान्देश लवकरच होणार ब सत्ता मुक्त.डॉ निळकंठ नरहर पाटील !

खान्देश लवकरच होणार ब सत्ता मुक्त.डॉ निळकंठ नरहर पाटील !
पाचोरा (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षापासून खान्देश नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील अनेक गावे ब सत्ता मध्ये आहेत.त्यामुळे ग्रामस्त मंडळी ना खरेदी ना विक्री करू शकत.या अडचणी डॉ नीलकंठ पाटील यांनी प्रत्यक्ष काही गावी अनुभवल्या आणि त्यांनी मा उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांना विंनती पत्र सादर केले.आणि चाळीस गावे पाचोरा भडगाव तालुक्यातील यांना ब सत्ता मधून वगळण्यास सांगितले एव्हडेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र ब सत्ता मधून काढावा.तसेच १५% लागणारा सरकारी नजरानाही बाद करावा अशी विनंती केली.त्याची प्रचीती अशी की लगेच मराठवाडा ब सत्ता मधून काढण्याचा प्रस्थाव देवेन्द्रजीनी घेतल्याची बातमी आली.पाचोरा तालुक्यातील गावे.कळमसरा,कुरंगी,कुर्हाड खु,गाळण बु,तारखेडा खु,तारखेडा बु,नांद्रा,पाचोरा,पिंपळगाव बु,बाळद बु,बांबरुड राणी,भोकरी,माहेजी,लासगाव,लोहटाए,लोहारा,लोहारी खु,वडगाव आंबे,शिंदाड,सातगाव डो,सामनेर.भडगाव तालुका आमडदे,आंचळगाव,कजगाव,खेडगाव,गिरड,गुढे,गोंडगाव,जुवार्डी,कोळगाव,टोनगाव,पिंपरखेड,पिंपळगाव बु,बांबरुड प्र भ,भडगाव,महिंदळे,वडजी,वडगाव खु,वाडे,शिंदी या गावांची यादी ही सादर केली.



