पुण्यात नवीन मनसे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन.
पुणे (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यात नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकांमध्ये मनसेचे वातावरण चांगलंच असेल. सध्या माझं इंजिन मीच चालवतोय. निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार एकला चलो रे अशी भूमिका राहील, असं राज ठाकरे म्हणाले.
आरक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या वेळेला मुंबईला मोर्चा निघाला होता. त्यावेळी सगळेच नेते गेले होते. त्यावेळी सगळ्यांना मान्य होतं तर मग अडलंय कुठे. केंद्राच्या सरकारला मान्य आहे राज्य सरकारला मान्य आहे. मग अडवलय कुणी? कोर्टात व्यवस्थित मांडल जात नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. ते म्हणाले की, समाजाचे प्रश्न आले की तोंड फिरवायचे. आता समाजाने विचारलं पाहिजे. आरक्षण प्रकरणी राजकारण आहे का काय आहे हे समाजाने बघितलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.